HW News Marathi
देश / विदेश

#VizagGasTragedy | विशाखापट्टणममध्ये वायुगळतीमुळे ९ जणांचा मृत्यू, ३०० जण रुग्णालयात दाखल

विशाखापट्टणम | आज (७ मे) विषाखापट्टणम पॉलिमर कंपनीत विषारी गॅस गळती झाली. या गॅस गळतीमुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ वर्षांच्या एका मुलीसह २ जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एकूण ३०० जणांना या गॅस गळतीने बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाखापट्टणम जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी तिरुमाला राव यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या विषारी वायूच्या गळतीमुळे जवळपासच्या परिसरावर परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण कळू शकलेले नाही. वायूगळतीची माहिती मिळताच विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद घटनास्थळी दाखल झाले. वायू गळतीच्या परिसरात लोकांना न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जेथे होते तेथेच कोसळले. एकीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना ही दुर्घटना अचानक घडल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Amritsar : लोकांचा उद्रेक, पोलिसांवर केली दगडफेक

Gauri Tilekar

हिमाचलमध्ये प्रेमकुमार धूमल भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार 

News Desk

छत्तीसगडमध्ये ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk