HW News Marathi
देश / विदेश

“शेतकऱ्यांनी आपल्या घरी परत जावं!”, मोदींचं आंदोलन करणाऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरू नानक जयंतीनिमित्ताने मोठी घोषणा केली आहे. मोदींनी आज (१९ नोव्हेंबर) देशाला संबोधित करताना कृषीविषयक तिन्ही कायदे मागे घेण्याचं घोषणा केली. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांनी आपल्या घरी परत जा. आणि तुमच्या कुटुंबात परत जा आणि शेतात जावा, असं आवाहन देखील देशाला संबोधित करताना केले. या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.

“मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, आता आपण आपल्या घरी परत जा. आणि कुटुंबात परत जा आणि शेतात जावा. आता आपण आजपासून नवी सुरुवात करत आहोत. सरकारनं आजपासून झिरो बजेट शेतीला सुरुवात करणार आहोत. तसेच आता पिकांची रचना बदलण्यासाठी, एमएसपी वाढवण्यासाठी एक समितीची स्थापना करत आहोत. यात कमिटीत केंद्र सरकार, राज्य सरकार, कृषी अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी संघटना यांचे सदस्य सहभागी असतील,” असं मोदी म्हणाले.

देशाला संबोधित करताना मोदी नेमके काय म्हणालं

“आमच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. या कायद्यानं देशातील छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी होती. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होत होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही प्रामाणिक हेतूनं शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कृषी कायदे आणले होते. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना कृषी कायदे समजवण्यसाठी अर्थशास्त्रज्ञ आणि शेतकरी तज्ञ यांची देखील मदत घेतली होती. आणि हे कृषी कायदे समजावून सांगण्याचा सर्वप्रकरं आम्ही प्रयत्न केले. आम्ही शेतकऱ्यांना व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आम्ही ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.”

तसेच “आम्ही कायदे दोन वर्ष स्थगित करण्यास तयार झालो. पण, केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. मी देशवासियांची माफी मागून सांगतो की, आमची तपश्चर्या कमी पडली असेल. दिव्याच्या प्रकाशासारखं सत्य आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. आज गुरुनानक यांचं प्रकाश पर्व आहे. आज मी कोणालाही दोष देणार नाही. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसंदेच्या अधिवेशनात आम्ही ते कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू.” अशी घोषणा मोदींनी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडले

News Desk

ऑस्ट्रेलियाचे भारतीय उच्चायुक्त barry o’farrell Ao कडून मुख्यमंत्र्यांना मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

News Desk