HW News Marathi
देश / विदेश

भारताच्या एअर स्ट्राईकमुळे मोठे नुकसान झाले, जैश-ए-मोदम्मदची कबुली

नवी दिल्ली | भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या जैश-ए-मोदम्मदच्या तळांवर केलेल्या कारवाईत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे पाकिस्तानचे सरकार आणि पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले होते. मात्र, खुद्द जैश-ए-मोहम्मदने भारताच्या या हल्ल्यामुळे आपले मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरचा लहान भाऊ अम्मार याने एका ऑडिओ क्लिपद्वारे ही कबुली दिली आहे.

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमधील तळ उद्धवस्त केले असून मर्काजवर (धार्मिक शिक्षणाचे केंद्र) बॉम्ब फेकल्याचे सांगत अम्मार याने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शत्रूंनी युद्ध पुकारले आहे, असेही अम्मारने या ऑडिओमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर अम्मार यांची ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे. “भारतीय विमानांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केलेला नाही. मात्र, त्यांनी आमच्या केंद्रांवर हल्ला चढवला होता”, असे अम्मारने गुरुवारी (२८ फेब्रुवारी) रोजी पेशावरमध्ये झालेल्या एका जनसभेत म्हटले होते.

भारतीय गुप्तहेर यंत्रणेकडे एसएआरच्या साहाय्याने टिपलेली काही छायाचित्रे उपलब्ध असून या छायाचित्रांमध्ये भारतीय हवाई दलाकडून चार इमारती पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतीतले वृत्त दिले आहे. पाकिस्तानने देखील पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या या कारवाईची कबुली दिली होती. मात्र, यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. मात्र, आता खुद्द जैश-ए-मोहम्मदनेच आपले मोठे नुकसान झाल्याचे कबूल केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल करारापूर्वी अंबानींनी घेतली फ्रान्स संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट ?

News Desk

केजरीवालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो आणि बसमध्ये प्रवास केला मोफत

News Desk

कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दोघींची आत्महत्या

News Desk