HW News Marathi
देश / विदेश

आम्ही कलम ३७१ ला हातही लावणार नाही, अमित शाहांचे आश्वासन

नवी दिल्ली | “काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर आता ईशान्य भारतातील राज्यांना विशेष घटनात्मक दर्जा देणारे कलम ३७१ देखील हटविले जाणार असल्याची अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे. मात्र, आम्ही कलम ३७१ ला हात देखील लावणार नाही”, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. अमित शाह रविवारी (८ सप्टेंबर) गुवाहाटीमध्ये आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीत ईशान्य भारतातील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित होते.

“जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटविल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. लोकशाही असलेल्या देशात टीका करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण, आता तर कलम ३७० प्रमाणेच कलम ३७१ देखील रद्द करण्यात येणार असल्याची अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे. येथील लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप देखील यावेळी अमित शाह यांनी केला आहे.

“काश्मीरच्या कलम ३७० आणि ईशान्य भारताच्या कलम ३७१ मध्ये मोठी तफावत आहे. कलम 370 हे तात्पुरते होते मात्र कलम ३७१ ही विशेष तरतूद आहे. मी संसदेत देखील हे स्पष्ट केले आहे आणि आता सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा आश्वासन देतो की कलम ३७१ ला आम्ही हात देखील लावणार नाही. कलम ३७१ हटविले जाणार नाही”, असे अमित शाह यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट

Gauri Tilekar

इंदोरमध्ये सहा महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार

News Desk

मी कर्ज फेडेन पण व्याज देऊ शकणार नाही !

News Desk