HW News Marathi
देश / विदेश

देशातील तरुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचे कायम स्मरण ठेवावे !

नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्या साजऱ्या होणाऱ्या ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशभरात सुरू असलेल्या आंदोलनने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी देशातील जनता आणि तरुणांना आवाहन करत म्हणाले की, “कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी आणि तरुणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचे कायम स्मरण ठेवावे,” असे म्हणाले. संविधानाने आपल्याला काही अधिकार बहाल केलेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे, असे राष्ट्रपती म्हणाले.

लोकशाही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबरच देशाचा समग्र विकास आणि देशवासियांच्या कल्याणासाठी दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, असेही कोविंद यांनी सांगितले. तसेच आरोग्य विषयक योजनांवर सरकारचा विशेष भर, आयुष्मान भारतसारख्या योजनांमार्फत गरिबांपर्यंत मदत पोहचवली जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले. स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, देशाच्या प्रत्येक भागाचा विकास होणार ,लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे, देशातील या योजनांवर राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात भाष्य केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलावर सहा महिन्यांची बंदी, केंद्र सरकारला कायदा करण्याचे आदेश

News Desk

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

News Desk

मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस, खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत

News Desk