HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सेनेच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे !

मुंबई | भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या दमदार कारवाईबाबत अजित पवार यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे. “देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे. भारतीय वायू दलाने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या कारवाईचे कौतुक केले.

अजित पवार यांनी सभागृहात भारतीय सेनेचे अभिनंदन केले. “भारतीय सेनेने पुलवामा घटनेचे उत्तर चोखरीत्या दिले आहे. यात आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून सहभागी आहोत”, असे अजित पवार म्हणाले. आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय वायू सेनेने दिल्यानंतर त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उमटले.

भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्याकडून अवघ्या २० मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी अमित शहा आता कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्यांची शरद पवारांनी घेतली भेट !

News Desk

‘धारावी’ला आरोग्यमंत्र्यांची भेट, क्वारंटाईनसह कोरोना रुग्णालयाची केली पाहणी

News Desk

राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला

News Desk