HW News Marathi
देश / विदेश

प्रचंड आर्थिक तोट्यात असलेली बीएसएनएल अखेर बंद होणार ?

मुंबई | सद्यस्थितीत दूरसंचार क्षेत्रात तग धरू शकत नसल्याने केंद्र सरकार ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) ही देशातील सर्वात जुनी दूरसंचार कंपनी बंद करण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या मोबाईल सेवा क्षेत्रातील पदार्पणानंतर या क्षेत्रातील स्पर्धा प्रचंड वाढली. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भल्याभल्या मोठ्या कंपन्यांना देखील एकत्र यावे लागले.

दूरसंचार क्षेत्रातील या स्पर्धेत सरकारी कंपनीचा टिकाव लागणे आणखीच कठीण झाल्याचे दिसत आहे. सरकारची बीएसएनएल ही कंपनी सध्या प्रचंड आर्थिक तोट्यात असल्याची माहिती मिळत आहे. हा तोटा इतका जास्त आहे कि केंद्राकडून एकेकाळी देशातील सगळ्यात मोठे टेलिकॉम नेटवर्क असणार अशी ही कंपनी बंद करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात बीएसएनएलच्या उच्चपदस्थांची बैठक देखील झाली. दरम्यान, बीएसएनएलमध्ये मोठ्या संख्येने असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हा निर्णय घेणे कठीण झाल्याचे समजते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्राइम सीरिअल पाहून तिघांनी लुटली बँक, टॅटूवरून चोरीचा छडा

News Desk

अपूर्ण ताट वाढल्यानंतर खायचं काय?, विनायक राऊत लोकसभेत कडाडले

News Desk

भाजपने पंकजा मुंडेंवर सोपवली मोठी जबाबदारी!

News Desk