HW News Marathi
देश / विदेश

सलमानला जामीन मिळणार का?

जोधपूर | काळवीट शिकार प्रकरणी तुरुंगात गेलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात सलमानला जोधपूर सत्र न्यायालयाने गुरुवारी ५ वर्षाची शिक्षा आणि १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या वकीलाने सत्र न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली.

शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी सलमानला ताब्यात घेत जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सलमाने संपूर्ण रात्र या कारागृहात काढली असून त्यांच्या जामीन मिळतो की, तुरुंगातला त्यांचा मुक्काम वाढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सलमानला तुरुंगात रवानगी केल्यानंतर त्याला कैदी नंबर १०६ देण्यात आला आहे. या प्रकरणातील सहआरोपी सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि सैफ अली खान यांना न्यायालायने निर्दोष मुक्तता केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आर्टीफिशिअल इंटेलिजन्समध्ये भारताने भरीव कामगिरी करावी – पंतप्रधान

News Desk

‘ब्लॅक फंगस’चा कहर! साथीचा आजार म्हणून जाहीर, केंद्र सरकारच्या राज्यांना सुचना

News Desk

‘विरोधी पक्ष नेते दिल्लीत जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका’, राऊतांचा फडणवीसांना टोला  

News Desk
देश / विदेश

बिष्णोई समाजामुळे सलमानला ५ वर्षाची शिक्षा

News Desk

जोधपूर | काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा आणि १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या २० वर्षापासून रखडलेल्या काळवीट शिकार प्रकरणीचा निकाल लागला आहे. या प्रकरणात सैफ आली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सलमानला शिक्षा होण्यासाठी राज्यस्थानमधील बिष्णोई समाजाने महात्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

बिष्णोई समाज नेमका आहे तरी कोण?

बिष्णोई समाजाने सतत पाठपुरावा केल्यामुळे काळवीट शिकार प्रकरणाचा सलमानला ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हा समाज राजस्थानच्या वाळवंट परिसरात आढळतात. या बिष्णोई समाजाला निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी ओळखले जाते. या समाजातील लोक प्राण्यांना देव मानतात. बिष्णोई समाज २९ नियमांचे पालन करत असून बिष्णोई शब्द २० म्हणजे बीस आणि नोई म्हणजे ९ यापासून तयार झाला आहे.

बिष्णोई समाजातील महिला जंगली जनावरांचे पालन-पोषण करतात. त्यांना आपल्यामुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात. या समाजातील लोक जाती-धर्मावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोक त्यांचा स्वीकार करतात.

Related posts

श्रीलंकेत आज ८७ बॉम्ब हस्तगत, मध्यरात्रीपासून लागू होणार आणीबाणी

News Desk

देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान! – राष्ट्रपती

Aprna

मध्य प्रदेश: व्यापमं घोटाळ्यातील आणखी एका आरोपीची आत्महत्या

News Desk