HW News Marathi
देश / विदेश

… म्हणून संपूर्ण देशाला दोषी ठरविणार का ? सॅम पित्रोडांकडून पाकिस्तानची पाठराखण

नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांनी पाकिस्तानची पाठराखण केली आहे. “काही जण येऊन हल्ले करतात म्हणून संपूर्ण देशाला दोषी ठरविणार का ?”, असा सवाल सॅम पित्रोडा यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पित्रोडा यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी आम्ही देखील विमाने पाठवू शकत होतो. मात्र असे करणे योग्य नाही”, असे म्हणत पित्रोडा यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर नाराजी व्यक्त केली आहे.

“आपण नेमका कुठे हल्ला केला, खरंच ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला का ? भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले याची माहिती सरकारने द्यावी”, अशी मागणी देखील पित्रोडा यांनी केली आहे. जर ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असेल तर भारतीयांना याची माहिती मिळायला हवी. आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणतात कि, भारताच्या हवाई दलात कोणीच मारले गेले नाही. मला हे ऐकून एक भारतीय म्हणून वाईट वाटते”, असे देखील पित्रोडा यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत बसून शेती करता येत नाही, शरद पवारांनी मोदींना फटकारलं 

News Desk

हिराकिंग निघाला घोटाळेबाज

News Desk

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit