HW News Marathi
देश / विदेश

चीनीमधील भूकंपात १०० ठार

बीजिंग – भारताशी युद्धाच्या वल्गना करणारा चीन सध्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडला आहे. भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यामुळे चीनच्या नैऋत्य भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्री झालेल्या ६.५ रिश्टल स्केलच्या या भूकंपात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, असे एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या भूकंपामुळे सुमारे एक लाख ३० हजार घरांचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. अनेक पूल आणि इमारती ढासळल्या आहेत. ४१ वर्षांपूर्वी २८ जुलै १९७६ मध्ये चीनमध्ये ८.३ तीव्रतेने भूकंप झाला होता. या भूकंपात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. राजधानी बीजिंगच्या उत्तर-पूर्वमध्ये स्थित तांगशान शहर उद्ध्वस्त झाले होते. शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळून जमीनदोस्त झाली होती. त्यामध्ये जवळपास२००० लोकांचा मृत्यू झाला होता. भूकंप इतका मोठा होता, की रस्ते, पूल, रेल्वे स्टेशन, घरे आणि कंपन्या उद्ध्वस्त होऊन धुळीस मिळाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उर्मिला मातोंडकरांचा मोदींवर निशाणा!

News Desk

शरद पवारांनी अमित शहांची भेट घेतली? महाविकासआघाडी सरकारची समीकरणे बदलणार?

News Desk

#PulwamaAttack : ‘उरी’च्या कलाकारांनी देखील व्यक्त केला निषेध

News Desk
देश / विदेश

पॅगोडावर उगवला महाकाय वृक्ष

News Desk

चीन – जमिनीत उगवलेले आणि वाढलेले ढेरेदार वृक्ष आपण नेहमीच पाहातो. मात्र टोलजंग इमारतीच्या चक्क छतावर उगवलेला महाकाय वृक्ष कधी पाहिला आहे का? नसेलच पाहिला. पण असा वृक्ष चीनमध्ये अस्तित्वात आहे.

चीनमधल्या हुबै प्रातांत एक पॅगोडा आहे. १४० फूटांपेक्षा उंच असलेल्या या पॅगोडाच्या कळसावर डेरेदार वृक्ष आहे. गेल्या तब्बल १०० वर्षांपासूनचा वृक्ष असून दहा फूट उंचीच्या या वृक्षाला दररोज क्रेनच्या मदतीने पाणी घातले जाते. १५ व्या शतकात मिंग साम्राज्याच्या काळात हा पॅगोडा इथे बांधण्यात आला. त्यानंतर हा डेरेदार वृक्षउगवला कसा इतका वाढला कसा, याबद्दल कुणालाही काहीच माहिती नाही. पण दरदिवशी या वृक्षाला पाणी दिलं जात आणि त्याची काळजीही घेतली जाते. कारण हा वृक्ष तोडल्या जुन्या इमारतीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

Related posts

दोषी खासदार आमदारांवर आजन्म बंदी

News Desk

काबुलवरून निघालेलं विमान भारतात सुखरूप पोहोचलं!

News Desk

#MahatmaGandhi : जाणून घ्या… महात्मा गांधींविषयी दुर्मिळ माहिती

News Desk