HW News Marathi
देश / विदेश

पावसासाठी दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह

इंदूर – मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी एक विचित्रच उपाय योजण्यात आला आहे. चांगल्या पावसासाठी यज्ञयाग, पूजाअर्चा आदी नेहमीचे मार्ग न चोखाळता येथे चक्क दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह लावून देण्यात आला. इंदूरच्या मुसाखेडी गावात ही अजब घटना घडली.

गावात चांगला पाऊस पडावा म्हणून हा प्रतिकात्मक विवाह करण्यात आला आणि वरुणराजाला साकडे घालण्यात आले. राकेश व सखाराम अशीलग्न लावून दिलेल्या तरुणांची नावे आहेत. अगदी रितसर सात फेरे घेऊन मुसाखेडी गावात हा विवाह लावण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात वरात निघाली. त्यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इंद्रदेवाला खूष करण्यासाठी हे विवाहकार्य केल्याचे सोहळ्याचे आयोजक रमेश सिंह तोमर यांनी सांगितले. राकेश व सखाराम शेतमजुरीचे काम करतात. संपूर्ण गावाने या अजब विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वरुणदेवाची प्रार्थना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

2 इंचांमुळे असे काही घडले, त्याला पाच लाख मोजावे लागले

News Desk

छगन भुजबळ यांचा जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

News Desk

“त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे”, जावेद अख्तरचं ते वक्तव्य चर्चेत

News Desk
महाराष्ट्र

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

नाशिक : काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आवक घटली आहे. त्याच वेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातमध्ये मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. परिणामत; किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे.

नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

पावसाने सध्या उघडीप दिलेली असली, तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. मात्र आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८०रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागत आहेत

Related posts

राज्यपालांच्या आढावा बैठका रद्द, घेतले एक पाऊल मागे!

News Desk

यामुळे त्या लोकांना सोडून देण्यात आले- एनसीबी

News Desk

राज्यातल्या प्रोड्यूसर्संना मुख्यमंत्र्यांनी दिल्या विशेष सूचना!

News Desk