HW News Marathi
देश / विदेश

पावसासाठी दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह

इंदूर – मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी एक विचित्रच उपाय योजण्यात आला आहे. चांगल्या पावसासाठी यज्ञयाग, पूजाअर्चा आदी नेहमीचे मार्ग न चोखाळता येथे चक्क दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह लावून देण्यात आला. इंदूरच्या मुसाखेडी गावात ही अजब घटना घडली.

गावात चांगला पाऊस पडावा म्हणून हा प्रतिकात्मक विवाह करण्यात आला आणि वरुणराजाला साकडे घालण्यात आले. राकेश व सखाराम अशीलग्न लावून दिलेल्या तरुणांची नावे आहेत. अगदी रितसर सात फेरे घेऊन मुसाखेडी गावात हा विवाह लावण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात वरात निघाली. त्यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इंद्रदेवाला खूष करण्यासाठी हे विवाहकार्य केल्याचे सोहळ्याचे आयोजक रमेश सिंह तोमर यांनी सांगितले. राकेश व सखाराम शेतमजुरीचे काम करतात. संपूर्ण गावाने या अजब विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वरुणदेवाची प्रार्थना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार 

News Desk

राहुल गांधींनी शिवजयंतीनिमित्त मराठीतून शुभेच्छा

News Desk

२०२१ वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आज, जाणून घ्या कुठे दिसणार हे ग्रहण

News Desk