HW News Marathi
देश / विदेश

शंभर पूल अतिधोकादायक

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशभरातील सुमारे शंभर पूल अतिधोकादायक असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत प्रश्नोत्तर तासादरम्यान दिली. गेल्या वर्षी सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच देशभराती अनेक ठिकाणी पूल कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना गडकरी यांनी ही माहिती दिली.

गडकरी यांच्या अखत्यारित असलेल्या विभागाने देशभरातील एक लाख साठ हजार पुलांचे आॅडीट केले असून जवळपास शंभर पूल अतिधोकादायक असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. या पुलांची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे. देशातील पूल आणि रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांची आवश्यकता आहे. एवढा मोठा निधी देण्यात अडचणी आहेत. त्या दूर करून पुलांची दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी दक्षता घेत इंटरनेट सेवा बंद

News Desk

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit

नवाज शरीफ आणि मुलगी मरियमला विमानतळावर अटक

News Desk