HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

नवोदित मंडळाची माऊली

मुंबई | विक्रोळी पार्क साईट परीसरात असलेल्या नवोदित मित्र मंडळाची देवी ” पार्कसाईट ची माऊली” म्हणून प्रसिद्ध आहे. नवोदित मित्रमंडळाची स्थापना १९७५ साली झाली आहे. यंदा या नवरात्रोत्सावाचे ३३ वे वर्ष आहे. नवरात्रोत्सवाला १९८५ पासून मंडळाने सुरुवात केली आहे.
दरवर्षी मंडळ नवरात्रीच्या कालावाधीत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करते. या ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मंगळागौर पाककला स्पर्धा, गरबाआदी स्पर्धांचा समावेश असतो. यंदा या देवीची आरास कापडी सजावटीने पर्यावरण पूरक पद्धतीने केली आहे.
देवीची ८ फुटांची देखणी मुर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेणारी आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही मंडळाने नवरात्रोत्सावाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पद्मश्री पी.व्ही. सिंधूचा रोमांचक प्रवास

News Desk

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।

News Desk

…म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात

News Desk
राजकारण

भुजबळ समर्थक राज दरबारी

News Desk

मुंबई | छगन भुजबळ समर्थक आमदार, खासदारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. गेल्या दोन वर्ष्यापासून भुजबळ यांच्यावर अन्याय सुरु आहे. सुडाचे राजकारण सुरु आहे, त्यांना जमीन मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहेत. आमचा विकास काराहृहात कोंडला गेलाय.

नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, अशी तक्रार भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन केली. राज यांनी देखील भूजबळावर अन्याय झाल्याचे मान्य केले. यापुढे भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे असे राज यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज यांना भेटण्यासाठी आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी जिरवा, माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी खासदार देविदास पिंगळे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राधाकृष्ण सोनावणे आदी हजार होते.छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याबरोबरच बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील कलम 45 लावले होते. त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत जामीन मिळालेला नाही.

Related posts

“…तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील”, राज ठाकरेंचा इशारा

Aprna

राज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न !

News Desk

आता हैदराबादचेही नाव बदलणार ?

News Desk