HW News Marathi
राजकारण

राज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न !

मुंबई | “महाराष्ट्रात जनतेच्या मनात असलेले, एक मजबूत सरकार आणण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत”, असे विधान आज (१७ नोव्हेंबर) राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट अचानक रद्द झाल्यानंतर पुण्यात राष्ट्रावादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. “राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भात आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सोनिया गांधी आणि शरद पवार यांची कोणती बैठक कधी होणार याबाबत मला माहिती नाही”, असे जयंत पाटील म्हणाले.

“मला असे वाटते कि महाराष्ट्रात जनतेच्या मनात असलेले सरकार आणण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. हा प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी थोडा वेळ लागला तरीही चालेल. परंतु, आता राज्यात एक मजबूत आणि ५ वर्षे टिकणारे सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनेच आमच्यात चर्चा सुरु आहे”, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले आहे. त्याचप्रामणे, “शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील त्यानंतरच मसुद्याबाबतचा निर्णय होईल”, असेही जयंत पाटील म्हणाले.

संजय राऊतांना कोणत्या गोड बातमीची अपेक्षा ते माहिती नाही !

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठोपाठ आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील “लवकरच गोड बातमी येईल”, असे विधान केले होते. याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, “सुधीर मुनगंटीवार असे बरेच दिवस सांगत होते कि, गोड बातमी लवकरच येईल. अजून त्यांची ती गोड बातमी आलेली नाही. पण संजय राऊत यांना कोणत्या गोड बातमीची अपेक्षा आहे, ते नेमके कशाबद्दल बोलत आहेत ते मला माहिती नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला दिना निमित्ताने विधानसभेत महिला सदस्य मांडणार लक्षवेधी

Aprna

लोकसभेचे अधिवेशन संपताच सुरु झाली राजकीय आकडेमोड

News Desk

पुतण्या आला धावून

Gauri Tilekar