HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

हा तर समस्त महिलावर्गाचा अपमान !

जयपूर |वसुंधरा राजेंना आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत”, असे वादग्रस्त विधान माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केले होते. या वादग्रस्त विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी प्रत्युत्तर दिल्या. वसुंधरा म्हणाल्या की, हा तर समस्त महिलावर्गाचा अपमान असल्याचे म्हटल्या आहेत. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (७ डिसेंबर) मतदान प्रक्रिया सुरू आहे.झालरापाटन येथे वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शरद यादव यांच्या टीकेला उत्तर दिले.

शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावक वादग्रस्त विधान केले. राजस्थानच्या अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी म्हटले की, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत. आणि त्यांना आता आराम द्यायला हवा. तसेच वसुंधरा राजे मध्य प्रदेशची कन्या असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते.

शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवोदित मंडळाची माऊली

News Desk

…म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात

News Desk

नवरात्रोत्सवाची २९ वर्षांची अखंड परंपरा, चेतनाची माऊली

Gauri Tilekar
राजकारण

‘युती झाली नाही तरीही लोकसभेला भाजपसोबत’

News Desk

सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मदत केल्यामुळेच खानापूर-आटपाडी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लागला. मतदारसंघातील बहुतांशी गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप – सेनेची युती झाली तरी आणि नाही झाली तरी माझा पाठिंबा हा भाजप उमेदवारालाच राहील, अशी ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. माझी ही बांधिलकी खासदार संजय पाटील यांच्यासाठी नसून भाजपसाठी आहे. अशी भूमिका यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मांडली.

आमदार बाबर म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक पाठिंब्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीकडून मला अध्यक्ष पदाची ‘ऑफर’ होती. परंतू मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने माझ्या मतदारसंघातील टेंभू योजनांच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची मदत केली. भाजपकडून कोणीही उमेदवार असला तरी त्याचा प्रचार करणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांत खासदार पाटील यांची भूमिका माझ्या विरोधातच होती. तरीही ते भाजपचे उमेदवार असतील तर माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.

Related posts

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दया !

News Desk

भाजप-शिवसेना युती कायम राहणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

News Desk

“तुम्ही तिकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा,” राऊतांचा शिंदे गटाला टोला

Aprna