HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही भाजपला धक्का ? शरद पवारांची असेल प्रमुख भूमिका ?

नुकत्याच बिहार विधानसभा निवडणूक पार पडल्या आणि देशभरात या निवडणुकांची मोठी चर्चा झाली. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपची सत्ता आली खरी मात्र यात भाजप जेडीयूला वरचढ ठरली. त्यामुळे कुठेतरी नितीश कुमारांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळालेच होते. त्यातच आता एकीकडे बिहारमधील विजयानंतर भाजपने अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे ६ आमदार फोडल्याने जेडीयूमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हीच अस्वस्थता नेमकी हेरून आता आरजेडीकडून याचा राजकीय फायदा उचलला जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. आणि विशेष म्हणजे या सगळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

#SharadPawar #LaluPrasadYadav #NitishKumar #TejashwiYadav #Bihar #BiharPolitics #BJP #RJD #JDU #Maharashtra #MahaAghadi #MahaVikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनोहर जोशींच्या आठवणीतले ‘अटलजी’

swarit

जेव्हा आमदार Rohit Pawar थालीपीठ बनवतात…

News Desk

12 सदस्य तालिबानी किंवा गुंड नाहीत, Bhagatsingh Koshyari यांच्यावर दबाव असेल तर सांगावं

News Desk