HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक ! राज्यपालांची तक्रार केली थेट मोदींकडे…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, पीक विमा, चक्रीवादळाने झालेलं नुकसान यांसह महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधला वाद आता सर्वश्रुत आहे. आणि तो चिघळत चालल्याने अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. अशातच मोदींसोबतच्या आजच्या भेटीत अजित पवारांनी चांगलीच संधी साधली आहे. कारण राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आपल्याकडे राखून ठेवली असून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही, हा मुद्दा अजित पवार यांनी मोदींच्या समोर मांडला.

#AjitPawar #NarendraModi #UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #ChandrakantPatil #NCP #BJP #MVA #MahaVikasAghadi #ModiGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

Atul Chavan

Mangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान

Manasi Devkar

Rashmi Shukla यांची महाराष्ट्रात ‘घरवापसी’ होणार?

Manasi Devkar