HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का ! उच्च न्यायालयाने मेट्रो कारशेड थांबवण्याचे दिले आदेश

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर आज (१६ डिसेंबर) राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे. कांजूरमार्गच्या जागेवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनंही दावा ठोकला आहे. हाच वाद आता हायकोर्टात गेला आहे. आज या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाच्या वतीने एमएमआरडीएला देण्यात आले आहेत.

#Kanjurmarg #Metro #Carshed #Maharashtra #Mumbai #Mahavikasaghadi #UddhavThackeray #DevendraFadnavis
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘Rape Crisis Centre’ चा बलात्कारपिडीत महिलांना कसा फायदा होणार ?

News Desk

चंद्रकांत पाटील आणि भाजप शरद पवारांचं कौतुक का करतयं ?

News Desk

जनतेच्या समोर जाण्याचं धाडसच सरकारमध्ये नाही ! विखे पाटलांचा घणाघात

News Desk