HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेच्या 4 कार्यकर्त्यांची हत्या होऊनही शिवसेना गप्प का ?

मालाडमधील शाखा क्रमांक ३९ चे शिवसेना नेते आणि माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कुरारमधील गोकुळनगर परिसरात ही घटना घडलीय.

गोळीबारानंतर सचिन सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मालाड परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.रुग्णालयाबाहेर आणि सावंत यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचे सध्या बोलले जात आहे. कुरार पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या आधी अहमदनगर आणि भिवंडीत शिवसेना नेत्यांची हत्या झाल्यानंतर रविवारी सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या 4 कार्यकर्त्यांची हत्या होऊनही शिवसेना गप्प का ? आतापर्यंत शिवसेनेच्या ४ कार्यकर्त्यांची हत्या झाल्यानंतर स्थानिक पातळीवर निषेध व्यक्त होत आहे परंतु या घटनेची पक्षाने विशेष दखल घेतल्याचे अद्याप दिसून येत नाहीये… या उलट विविध विषयांचे राजकारण करण्यात पक्ष प्रमुख गर्क आहेत परंतु ते कार्यकर्त्यांच्या हत्येसंदर्भात काहीच का बोलत नाहीत हे मात्र सामान्यांना विचार करायला भाग पाडत आहे…..

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार कुठे आहे ? आमदार शिंदेंचा सवाल

News Desk

Yedu Mata यात्रेची पूर्व तयारी पूर्ण; 2 वर्षानंतर पहिल्यांदांच पाच लाख भाविक येण्याची शक्यता

News Desk

Chandrakant Patil Vs Pune Bhrahmins| कोल्हापूरच्या पाटलांमुळे पुण्याच्या ब्राम्हणांमध्ये फूट ? 

Arati More