HW News Marathi
व्हिडीओ

स्वबळाचा नारा भोवणार? नाना पटोलेंवर पक्षश्रेष्ठींची नाराजी! दिल्लीवारीत काय होणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, ते महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील नियोजित दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, पटोलेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. इतकंच नव्हे तर अशाही चर्चा आहेत कि नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटीलयांनी मोठं विधान केलं आहे. “आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वबळावर तयारी सुरु केली आहे, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेऊ”, असं पाटील म्हणाले. म्हणूनच, काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय ? याकडे सध्या लक्ष आहे.

#NanaPatole #UddhavThackeray #AjitPawar #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #Congress #SoniaGandhi #RahulGandhi #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

NCP ने आपल्या मताचा कोटा वाढवला, Eknath Khadse यांना सुरुक्षित करण्याचा प्रयत्न?

News Desk

Rohit Pawar यांनी Eknath Shinde-Devendra Fadnavis यांची भेट का घेतली?

Manasi Devkar

2 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये माविआचा भव्य मेळावा- Chandrakant Khaire

News Desk