HW News Marathi
व्हिडीओ

स्वबळाचा नारा भोवणार? नाना पटोलेंवर पक्षश्रेष्ठींची नाराजी! दिल्लीवारीत काय होणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, ते महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील नियोजित दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, पटोलेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. इतकंच नव्हे तर अशाही चर्चा आहेत कि नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटीलयांनी मोठं विधान केलं आहे. “आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वबळावर तयारी सुरु केली आहे, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेऊ”, असं पाटील म्हणाले. म्हणूनच, काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय ? याकडे सध्या लक्ष आहे.

#NanaPatole #UddhavThackeray #AjitPawar #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #Congress #SoniaGandhi #RahulGandhi #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीने मांडली ‘ही’ मोठी भूमिका!

News Desk

चिक्की घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट! Pankaja Munde यांच्या अडचणीत वाढ?

News Desk

मंत्रिपद गेलं तरी हे 14 मंत्री सरकारी बंगल्यातच

Manasi Devkar