HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत काय सुरु काय बंद ? नवीन नियम कोणते ?

संपूर्ण देशासह महाराष्ट्रालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला. गेल्या काही महिन्यांपासून या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आलेलं असलं तरीही कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप संपलेली नाही. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवले जाणार असून रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले जाणार आहेत, असंही स्पष्ट केले आहे. ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी सातपर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.

#UddhavThackeray #COVID19 #Maharashtra #RajeshTope #BreakTheChain #Unlock #Coronavirus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायकल रॅली माध्यमातून वाहतूक नियम आणि आरोग्याविषयी जनजागृती

News Desk

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका ! राऊतांचा सणसणीत इशारा

News Desk

चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Shivsena आणि Vanchit आमने – सामने

News Desk