HW News Marathi
व्हिडीओ

‘शिवराज्याभिषेक दिना’बद्दल महाविकास आघाडी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1664 ला राज्याभिषेक झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो.याच शिवराज्याभिषेक सोहळ्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे…६ जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन आता स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. महा विकास आघाडी सरकारने यंदापासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवी गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अशीही माहिती यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. नेमका कसा हा स्वराज्य दिन साजरा होणार याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

#HasanMushrif #UddhavThackeray #Mahavikasaghadi #NCP #Congress #Shivsena #ChhatrapatiShivajiMaharaj #Shivrajyabhishek
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंजारा समाजाच्या मागणीमुळे Sanjay Rathod यांना मंत्रिपद; Deepak Kesarkar यांचा खुलासा

News Desk

BJPच्या सर्वेक्षणानुसार Pune Elections ‘BJP’ साठी अवघड असल्याचं चित्र…

News Desk

Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं?

Manasi Devkar