महाराष्ट्राने गेल्या विधानसभेत, विधानसभेच्या निकालांनंतर आणि गेल्या संपूर्ण २ वर्षांत जे जे पाहिलंय ते तसं चित्र यापूर्वी राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात कधीच पाहिलं नव्हतं. राजकारण ढवळून निघतं म्हणजे नेमकं काय होतं? ते आपल्याला कळलं आणि ह्याच ऐतिहासिक घटनेला म्हणजे महाविकासआघाडीच्या स्थापनेला येत्या २८ नोव्हेंबरला २ वर्ष पूर्ण होतायत आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपण गेल्या या २ वर्षांत घडलेल्या रंजक राजकीय घडामोडींबाबत वातावरणाबाबत चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आज एक खास व्यक्ती आहेत. चला तर राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेचा संपूर्ण प्रवास अत्यंत सविस्तर आणि रंजकपणे आपल्या पुस्तकात मांडणारे Checkmate How The BJP Won and Lost Maharashtra या पुस्तकाचे लेखक, वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांच्याशी थेट बातचीत करूया. जाणून घेऊया त्यांच्या नजरेतली मविआ सरकारची ही २ वर्षे
#SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #HWExclusive #HWMarathiExclusive #Exclusive #MVAGovernment #BJP #Maharashtra #MaharashtraPolitics #SudhirSuryawanshiInterview