HW News Marathi
व्हिडीओ

मेट्रो कारशेडचे काम थांबवा ! मोदी सरकारचा दणका, ठाकरे सरकारही आक्रमक

ठाकरे सरकारच्या अत्यंत जवळचा विषय असलेल्या मेट्रो कारशेडवरून आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. ठाकरे सरकारनं आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला देखील सुरुवात केली होती. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर आपला दावा सांगितला असून सुरु असलेले काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं राज्य सरकारला पाठवलं आहे. तर यावर राज्य सरकारनेही आक्रमक भूमिका घेत “ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे”, असं स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोपही आता राज्य सरकारकडून केला जात असून केंद्र-राज्यातील हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

#MetroCarShed #UddhavThackeray #NarendraModi #Mumbai #Maharashtra #ThackerayGovernment #ModiGovernment #Kanjurmarg #AadityaThackeray #AshishShelar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राष्ट्रवादीला पायाखाली बुडवू’ Shivsena MP Sanjay Jadhav यांच्या वक्तव्याने NCP-Shivsena वाद पेटला !

News Desk

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

Atul Chavan

Vikhe फक्त Amit Shah यांना नाही तर NarendraModi यांना कुटुंबासोबत भेटले,Chandrakant पाटलांवर अन्याय?

News Desk