HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना-राष्ट्रवादीची काँग्रेसविरोधात रणनीती ? थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरूपम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्रात राज्यात काँग्रेसला बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस पक्षानं काय मिळवलं आणि काय गमावलं असं म्हणत त्यांनी काही मुद्दे या पत्राद्वारे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, खरंतर अगदी सुरुवातीपासूनच महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला डावललं जात असल्याची भावना नेत्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये वाढत गेलेली पाहायला मिळते. शिवसेना-राष्ट्रवादीला झुकतं माप मिळत असून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने अनेकदा महाविकासआघाडीत लहान-मोठे खटके उडताना दिसत आले आहेत. मात्र, प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आक्रमकपणे आणि थेट टीका करताना आणि आव्हाने देताना दिसत आहे.

#UddhavThackeray #SharadPawar #SoniaGandhi #BalasahebThorat #AshokChavan #MahaVikasAghadi #Shivsena #Congress #NCP #Maharashtra #SanjayNirupam #AjitPawar #BJP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकऱ्यांसाठी पुन्हा धावून आले Ravikant Tupkar; राज्य सरकारला दिला इशारा

Manasi Devkar

Sanjay Raut यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

News Desk

Congress Manifesto 2019 | कॉंग्रेसने लोकांना पुन्हा उल्लू बनवण्याचं काम केल !

News Desk