HW News Marathi
व्हिडीओ

वर्षभरानंतरही एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या आठवणी ताज्या, मुंबईकरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

वर्षभरापूर्वी एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला. तर ३९ जण जखमी झाले होते. चेंगरीचेंगरीची घटना हा घातपात असू शकतो, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या घटनेचा जवळपास वर्षभर सर्व बाजूंनी तपास केला. प्रत्येक पैलू पोलिसांनी तपासून बघितला. मात्र, यातून घातपात असल्याचे सिद्ध होईल, असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला याबाबत माहिती दिली. ‘चेंगराचेंगरीची घटना ही अफवेमुळे घडली. पादचारी पुलाच्या जिन्यावर थांबलेल्या लोकांमध्ये अफवा पसरली आणि ही घटना घडली. पोलीस रेकॉर्डमध्ये या घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी असेल, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातही पूल पडल्याची अफवाच चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत ठरल्याचे नमूद करण्यात आले होते. पूल पडल्याची अफवा पसरली आणि त्यामुळेच गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले. शॉटसर्किट किंवा अन्य कोणतीही अफवा पसरली नव्हती, असे यात म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik यांचा नवा गौप्यस्फोट,Sameer Wankhede यांचं maldive कनेक्शन?

News Desk

“Khotkar विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेच्या शेत्राबद्दल बोलू नये”; Raosaheb Danve

News Desk

यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच! सरकारने गणेश मंडळांसाठी जाहीर केली नियमावली

News Desk