HW News Marathi
व्हिडीओ

…अन् दवंडी पेटली, “आजपासून पाणी येणार हो!”; रोहिणीखेडला अखेर पाणीपुरवठा, ग्रामस्थ सुखावले

तुम्हाला आठवत असेल तर काहीच दिवसांपूर्वी आम्ही एक बातमी केली होती मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाची. ही बातमी अशी होती कि रोहिणखेड ग्रामपंचायतने पाणीपट्टी व घरपट्टीची वसुली करूनही गावकऱ्यांना तब्बल सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद केला होता. याबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत शासन व प्रशासनाला दिनांक २१ फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही पुढील आठ दिवसात ग्रामपंचायत शासन व प्रशासनाने या बाबतीत कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व नागरिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यावेळी मूलभूत सुविधांना मुकलेल्या गावकऱ्यांची तळमळ मराठीने पोहोचवली होती. आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी याबाबतची बातमी केली होती आणि त्यानंतर आता एक आनंदवार्ता आहे.

#Buldhana #WaterCrisis #RohinKhed #BJP #BuldhanaBJP #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra #ShwetaMahale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil Kolhapur | चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोर्चा

Gauri Tilekar

BMC निवडणुका होणारच नाहीत; Prakash Ambedkar यांचं धक्कादायक विधान

News Desk

“उत्तर नसलं की समोरच्याला छोटा पप्पू, पेंग्विन म्हणायचं”, Manisha Kayande यांचा विरोधकांना टोला

News Desk