HW News Marathi
व्हिडीओ

वीजपुरवठा बंद अन् अख्खी मुंबई ठप्प ! नेमकं काय घडलं ? दोष कोणाचा ?

मुंबई आणि उपनगरात आज (१२ Oct.) सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे, “भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगा”, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. विरोधकांकडून देखील या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर चांगलेच तोंडसुख घेण्यात आले आहे. हे नेमके काय आणि कसे घडले ? जाणून घेऊया. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी ४ वाजता ‘वर्षा’वर एक महत्वाची बैठक बोलाविली होती. या बैठकीत, नेमकी काय चर्चा झाली किंवा नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

#CMUddhavThackeray #MumbaiPowerCut #MumbaiPowerOutage #NitinRaut #Mumbai #MumbaiBMC #BMC #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Watsapp ban |Watsapp बंद होणार का ?

Arati More

आकाशातील ‘Sky Train’, चंद्रपुरात दिसली Elon Musk यांच्या 55 सॅटेलाईटची स्कायलिंक ट्रेन

Manasi Devkar

आम्हाला गद्दार म्हणू नका…आमदार Sanjay Shirsat यांची व्हिडिओ प्रतिक्रिया

News Desk