HW News Marathi
राजकारण

वरळीत संरक्षक भिंत बांधण्यासाठी २.५० कोटींचा निधी मंजूर

मुंबई | वरळीच्या सर पोचखानवाला रोड येथील हिलटॉप हॉटेल शेजारी असलेल्या परिवहन विभाग व आर.टी.ओ. ह्यांच्या जागेवर असलेली दरड नेहमी पावसात पडत असते. या ठिकाणी असलेल्या पदपथावरून सेक्रेट हार्ट शाळेमधील विद्यार्थी व पोलिस कॅम्प मधील रहिवाशी नेहमी ये-जा करत असतात. पावसात दरड पडून मोठी जीवित हानी होऊ शकते. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची गंभीर दखल घेऊन युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटिल ह्यांच्या प्रयत्नाने आणि शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते ह्यांच्या दालना मध्ये बुधवारी या विषयावरील बैठक पार पडली.

या बैठकीला दिवाकर रावते यांनी परिवहन विभागाच्या आयुक्तांना सदर जागेवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी २.५० कोटी चा निधी पास करण्यात आला आहे. तसेच संरक्षण भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले असून ते काम काही महिन्यातच सुरु करण्यात येईल. सदर बैठकीला परिवहन आयुक्त, सार्वजनिक बांधकाम प्रमुख अभियंता, मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते. तसेच उपविभाग अभियंता अनिल कानिटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना लाभले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जोरमथंगा यांनी घेतली मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

अमित शहा मुंबईत दाखल

News Desk

शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिलेला नाही | दानवे

News Desk
राजकारण

विधानभवनावर पोहचण्याआधीच ओला-उबर चालकांना पोलिसांनी रोखले

News Desk

मुंबई | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज (१९ नोव्हेंबर)ला सुरुवात झाली आहे. ओला-उबर चालक आपल्या मागण्यांसाठी विधानभवनावर धडक देणार होते. परंतु ओला-उबर चालक विधानभवनावर पोहचण्याआधीच भारतमाता सिनेमागृहाजवळ पोलिसांनी त्यांना रोखले. चालक त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करी रोडच्या भारतमाता चौकापासून ते विधानभवनापर्यंत मोर्च्या काढण्यासाठी मोठ्या संख्येने हजर झाले होते.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कर्मचारी संघाकडून ओला-उबर चालक मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शनिवारी रात्रीपासून अनेक ओला-उबर चालक संपावर गेले आहे. या चालक प्रतिकिमी प्रतिकिमी भाडे १८ रुपयांवरून २३ रुपये करण्यात यावे, कमीतकमी अंतरांसाठी नीच्चतम भाडे १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात यावे अशा मागण्यांसाठी ओला-उबर कर्मचारी संपावर गेले आहेत.

कल्याण,ठाणे,नवी मुंबईतील अनेक चालकही या मोर्च्यात आज सहभागी होण्यासाठी भारतमाता चौकात जमले होते. हजारोंच्या संख्येने ओला चालक मोर्चा काढणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होईल अशी भीती वर्तवण्यात येत होती. त्यामुळे मुंबईत सुरक्षच्या दृष्टीने हा मोर्चा सुरू होण्याआधीच तो पोलिसांनी अडवला आहे.

Related posts

काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपत प्रवेश

swarit

राजस्थानमध्ये जागावाटपावरून गेहलोत-पायलट समोरासमोर

News Desk

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk