HW News Marathi
राजकारण

देशभरात सहाव्या टप्प्यात ५९.७०% मतदानाची नोंद, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

नवी दिल्ली | देशभरात आज (१२ मे) लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा पार पडला आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील १४, हरियाणामधील सर्व म्हणजेच १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ तर झारखंडमधील ४ अशा एकूण ७ राज्यांतील ५९ मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या टप्प्यासह हरियाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या सर्व राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी आता हाती आली आहे. या टप्प्यात एकूण ५९.७०% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे.

सहाव्या टप्प्यातील ७ राज्यांतील मतदानाची टक्केवारी

सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि झारखंड या ७ राज्यांतील ५९ मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजेच ८०.१३ % तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी म्हणजेच ५०.८२% मतदानाची नोंद झाली आहे. यात पश्चिम बंगालमध्ये ८०.१३ %, दिल्लीमध्ये ५५.४४% , हरियाणामध्ये ६२.१४%, उत्तर प्रदेशमध्ये ५०.८२ %, बिहारमध्ये ५५.०४%, झारखंडमध्ये ६४.४६ % तर मध्य प्रदेशमध्ये ६०.१२ % इतके मतदान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर करणार; जामीन की कोठडी?

Aprna

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा ठराव संमत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

Aprna

केंद्राला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी आरबीआयची मदत

News Desk