HW News Marathi
राजकारण

एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही !

औरंगाबाद मराठा आरक्षणासंदर्भात १५ नोव्हेंबरपूर्वी सत्ताधारी पक्षांसह विरोधातील सर्व पक्षांनी भूमिका जाहीर केली नाही तर, २५ नोव्हेंबरनंतर एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे. औरंगाबाद येथील न्यू हनुमाननगर चौकात शुक्रवारी (२ नोव्हेंबर) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिसर्‍या पर्वाचे रणशिंग फुंकण्यात आले.

“मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दोन वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र समाजाला झुलवत ठेवत सरकारने अजून पर्यंत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही,राज्यकर्त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन मराठा मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी केले आहे .”अन्यथा २५ नोव्हेंबरनंतर राज्यातील २८८ आमदार व ४८ खासदारांना फिरू देणार नाही,” असा इशारा केरेनीं दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आपण गप्प बसणारच नाही; मराठा मरणारा नाही, तर लढणारा आहे. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन पूजा मोरे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिर्डीमध्ये मोदींनी केला शेतक-यांचा इव्हेंट’

News Desk

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी

Aprna

EXIT POLL : मिझोराममध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी तडजोड होणार का ?

News Desk