HW News Marathi
राजकारण

माहुलच्या भयग्रस्त रहिवाश्यांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

मुंबई | मुंबईच्या विविध भागांतील प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. नागरीसुविधांच्या अभावी प्रदूषित वातावरणात जगणाऱ्या येथील रहिवाश्यांचे जीवन धोक्यात आले आहे. येथील भारत पेट्रोलियम च्या प्रकल्पात नुकताच मोठा स्फोट झाल्याने या प्रकल्पग्रस्तांध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. माहुल च्या या भयग्रस्त राहिवासीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन धीर दिला.

येथील भयग्रस्त राहिवाश्यांच्या अडचणी समस्या गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्यांचे सुरक्षित योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. प्रकल्पग्रत राहिवासीयांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन रामदास आठवलेंना यावेळी देण्यात आले. वसाहती समोरील भारत पेट्रोलियामला जर आग लागली तर येथून बाहेर पडण्यास येथील राहिवाश्यांना मार्गच नसल्याने हे रहिवासी भयभीत झाले असल्याचे राहिवाश्यांनी रामदास आठवलेंना सांगितले.

यावेळी रामदास आठवलेंनी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती समोरील भारत पेट्रोलियम प्रकल्पात झालेल्या स्फोटाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे , महाराष्ट्र्र उपाध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, चंद्रशेखर कांबळे, हसन शेख, सुमीत वजाळे, संजय डोळसे, हेमंत रणपिसे, रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Aprna

स्वाभिमानीची ३ जागांची मागणी पूर्ण करण्यासाठी शरद पवारांचे विशेष प्रयत्न

News Desk

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळणार

News Desk