HW News Marathi
राजकारण

अजित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे आघाडीत सामील होणार ?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवास्थानी आज (१३ फेब्रुवारी) भेट झाली आहे. या भेटीनंतर मनसेला आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आघाडीत सामील करून घ्यायचे की नाही, यावर संभ्रमावस्था असताना अजित पवारांची भेटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीनंतर मनसेला आघाडीत घेण्याबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले होते की, ”प्रत्येक राजकीय पक्षाचा एक ठरावीक मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी लाख, दीड लाख मते घेतल्याचे समोर आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मनसेसंदर्भात मतभिन्नता असली तरी येत्या निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधातील मतविभाजन टाळण्यासाठी मनसेला सोबत घेणे गरजेचे असल्याचे अजित पवार म्हणाले. पवार पुढे असे म्हणाले की, भाजपाचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यामुळेच मनसेनेही आघाडीबरोबर यायला हवे, असल्याचे सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला का केलं नाही? तेव्हा सरकार कोणाचं होतं?; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Aprna

मुघल आक्रमणापूर्वी ‘हिंदू’ हा शब्दच अस्तित्त्वात नव्हता !

News Desk

योगी आदित्यनाथसह मायावती यांच्यावर प्रचारबंदी, निवडणूक आयोगाचा दणका

News Desk