HW News Marathi
राजकारण

चार वर्षानंतर भाजपला शिवसेनेची ताकत कळाली | संजय राऊत

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘नुकतीच पालघर लोकसभा पोटनिवडणूक झाली असून यात भाजपला शिवसेनेची खरी ताकद कळाल्यामुळे चार वर्षानंतर पहिल्यांदाच मातोश्रीची आठवण आली आहे. परंतु, शिवसेना आगामी निवडणुका ‘स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम’, असल्याचा देखील यावेळी राऊत म्हणालेत.

ही भेट होण्यापुर्वी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सध्या मुंबईत भाजपचे संपर्क अभियान सुरु आहे. या संपर्क अभियाना अंतर्गत अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान अमित शहा उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

देशात भाजप विरोधी वारे वाहू लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भाजपने मित्र पक्षांची नाराजी दूर करायला सुरुवात केली आहे. याचा श्री गणेशा शिवसेनेपासून भाजप करत असल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रत भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्र पक्षांना डावलले होते. त्यामुळे शिवसेनेने नाराजीचा सुर आळवला होतो. अमित शहा शिवसेनेला भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करणार का? याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मेट्रो कारशेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय”, उपमुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Aprna

शिवस्मारक बांधण्याआधी खर्च वसुलीचे सरकारला कोडे

News Desk

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

News Desk