HW News Marathi
राजकारण

लोकसभेच्या निकालानंतर शिवसेनेच्या २३ विजयी खासदारांना काशीविश्वेश्वराला घेऊन जाणार !

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. ११ एप्रिलपासून देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडतील. २३ मे रोजी या निवडणुकांचा निर्णय जाहीर होईल. दरम्यान, निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या २३ विजयी खासदारांना काशीविश्वेश्वराला घेऊन जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “आपल्या रक्ताचा, शरीराचा असलेला भगवा रंग उतरू देऊ नका. देशाचा पंतप्रधान काशीमधून येतो, म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात नव्हे तर सोबत उभे राहिलो आहोत”, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले. ते शिवार उद्यान येथे उत्तर भारतीयांचा होळी मिलन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

“तुमच्यापैकी अनेक जण माझ्या जन्माच्याही आधीपासून येथे राहत आहेत. माझ्यापेक्षाही चांगले मराठी बोलत आहेत. मी त्यांना वेगळे कसे समजू ? मी तुम्हाला होळीच्या शुभेच्छा द्यायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला येथे आलो आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. “माझ्यासाठी कोणी उत्तर हिंदुस्थानी, कोणी दक्षिण हिंदुस्थानी, कोणी पूर्व हिंदुस्थानी असे नाहीत. माझ्यासाठी सर्व हिंदू आणि हिंदुत्ववादी आहेत. मी येथे भाषण नाही तर ‘दिल की बात’ करण्यासाठी आलेलो आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय”, शरद पवारांची मिश्किल टीका

Aprna

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

News Desk

शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

News Desk