HW News Marathi
राजकारण

अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा

श्रीरामपूर | अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण ससाणे यांनी आज (२५ एप्रिल) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ससाणे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्ष सोडला नसल्याचे भूमिका देखील त्यांनी सांगितले आहे. डॉ.सुजय विखे पाटीलनंतर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो

या निवडणुकीत काँग्रेसचे काम करणार नाही, तठस्थ राहणार अशी भूमिका करण ससाणे यांनी घेतली आहे. ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांची आज शिर्डीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने राजीनामा दिला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान साईबाबांच्या झोळीत हात घालणा-याचे कधीच चांगले झाले नाही, असे वकतव्य केले होते. यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाणे समर्थक नाराज होते. त्यामुळे समर्थक कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका याआधीच जाहीर केली होती. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाक्ष्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुर्वीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण ससाणे यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : ९० कोटी मतदारांची ‘मते’ ठरविणार देशाचे भविष्य

News Desk

नवनिर्वाचित खासदारांसह उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत जाणार

News Desk

भारतीय जवानांच्या फोटोचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करून नये | निवडणूक आयोग

News Desk