HW News Marathi
राजकारण

अजित पवार यांनी खरंच राजकारणातून संन्यास घ्यावा !

मुंबई | देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकांचा चौथा टप्पा पार पाडत आहे. महाराष्ट्रामध्ये १७ जागांवर मतदान होत आहे. या लोकसभेत विशेष लक्षवेधी ठरलेली लढत म्हणजे मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार. मावळमधील ही लढाई दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

मावळमध्ये मतदान केल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी बातचीत केली. मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव होईल, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे. “मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव होईल. तेव्हा अजित पवार यांनी खरंच राजकारणातून संन्यास घ्यावा. पार्थचा पराभव नक्की आहे”, असे श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

“बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे अजित पवार म्हणाले होते. मात्र, पार्थ पवार हे मावळमधून निवडून येणार नाहीत हे अजित पवारांना माहिती आहे. म्हणूनच त्यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल तसे वक्तव्य केले नाही”, असेही बारणे यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे !

Gauri Tilekar

उमेदवार यादीत स्मृती इराणींच्या नावापुढे धर्माचा उल्लेख, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा

News Desk

जोरमथंगा यांनी घेतली मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk