HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारच्या नोटाबंदी-जीएसटीमुळे देशात आर्थिक मंदी !

नवी दिल्ली | देशाची घसरती अर्थव्यवस्थेवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील आर्थिक मंदीसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. सरकारवर निशाणा साधत मनमोहन सिंग म्हणाले की, “गेल्या तिमाहीत जीडीपी विकास दर ५ टक्के होता. देश सर्वात मोठ्या स्लोडाऊनमधून जात आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात आर्थिक मंदी आली असून उत्पादन क्षेत्राचा विकास अवघा ०.६ टक्के आहे.”

मनमोहन सिंग यांनी पुढे म्हणाले, ‘देशांतर्गत मागणी आणि वापराचे प्रमाण १८ महिन्यांतील सर्वाधिक कमी आहे. जीडीपीचे प्रमाण १५ वर्षांतील सर्वात कमी आहे. कर महसूल कमी असून लहान व्यापाऱ्यापासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांना ‘कर दहशतवादाची’ धास्ती सतावते आहे. गुंतवणुकदारांमध्ये साशंकतेची परिस्थिती आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या ज्या अवस्थ सापडली आहे. त्यांनी बाहेर येण्याची शक्यता आता नाही.’

दरम्यान ऑटोमोबाइल क्षेत्रात साडेतीन लाख नोकऱ्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर नोकरकपात झाली आहे. यामुळे मजुरांसमोर रोजच्या उपजिवीकेचे संकट उभे राहिले असल्याचे सिंह म्हणाले. ग्रामीण भागातही परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य भाव मिळत नाहीए आणि उत्पन्नात सतत घसरण होत आहे. असे सिंग म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानहानी प्रकरण: राहुल गांधी शिक्षेविरोधात सूरत न्यायालयात याचिका दाखल करणार

Aprna

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आज मतदान

News Desk

आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यांमधील सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार!  – डॉ. विजयकुमार गावित

Aprna