HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘आफ्स्पा’बाबतच्या आश्वासनावर अमित शहांची सडकून टीका

नवी दिल्ली | “काँग्रेस अध्यक्षांना सीमेवर लढणाऱ्या जवानांची शक्ती वाढवायची आहे कि जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे ?”, असा सवाल करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मंगळवारी (२ एप्रिल) आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जर केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर वादग्रस्त अशा आफ्स्पा कायद्यात सुधारणा करू, असे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. यावरून अमित शाह यांनी ही टीका केली आहे.

भारताच्या उत्तर पूर्वेकडून राज्यांमध्ये त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला सुरक्षेच्या दृष्टीने विशेषाधिकार देणाऱ्या आफ्स्पासारख्या संवेदनशील कायद्यात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हणत केंद्रात सत्तेत आल्यास आपण या कायद्यात बदल करू असे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या आश्वासनामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. “काँग्रेसला जवानांची ताकद वाढवायची आहे कि त्यांचे मनोबल खच्ची करायचे आहे ?”, असा सवाल अमित शाह यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हार्दिक पटेलने तयार केले स्वत:चे मृत्यूपत्र ?

News Desk

साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा आज होणार फैसला

News Desk

विधान परिषदमधील मतदान प्रक्रियेसाठी शिवसेनेची रंगीत तालीम

Aprna