HW News Marathi
राजकारण

…तर अनिल अंबानी हे भाजपचे मालक !

नवी दिल्ली | “काँग्रेससाठी जनताच मालक आहे. तर भाजपसाठी अनिल अंबानी हे त्यांचे मालक आहेत”, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेलवरून भाजपवर निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जाणारा उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड या २ मतदारसंघांमधून निवडणूक लढवतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अमेठीतील लोकांसाठी लिहिलेल्या पत्रात अमेठीतील लोकांना भावनिक साद घालत भाजपवर निशाणा साधला आहे.

“अमेठी हे माझे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाने मला धैर्य दिले आहे. अमेठीशी माझे भावनिक नाते आहे”, असे भावनिक विधान राहुल गांधी यांनी यावेळी केले आहे. “काँग्रेस पक्ष हा देशातील गरिबांसाठी, महिलांसाठी, छोट्या उद्योजकांसाठी काम करण्यास इच्छुक असतो. तर भाजपला गरीब, महिला, छोट्या दुकानदारांसाठी काम करू इच्छितो. परंतु, भाजपला मात्र केवळ १५ ते २० उयोजकांना मालक करायचे आहे. काँग्रेससाठी जनताच मालक आहे. तर भाजपसाठी अनिल अंबानी हे त्यांचे मालक आहेत”, असे राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आण्णा हजारेंचे चंद्रकांत दादांना पत्र

swarit

कन्हैया कुमार यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Gauri Tilekar

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे विधानभवनाबाहेर आंदोलन

News Desk