HW News Marathi
राजकारण

…तरीही उपोषण सुरू ठेवायला मी वेडा आहे का ?

राळेगणसिद्धी । “राज्य सरकार ९० टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा करत आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी स्पष्ट केले आहे. जर एवढ्या मागण्या मान्य झाल्या असत्या, तर आम्ही उपोषण का सुरू ठेवले असते ? उपोषण सुरू ठेवायला मी वेडा आहे का ?”, असा संतप्त सवाल अण्णा हजारेंनी केला आहे.

उपोषण केल्यानंतर केंद्रीय मंत्री माझ्या भेटीसाठी येणार होते. मात्र, मीच त्यांना येऊ नका असे सांगितले आहे. मला आता चर्चा नको तर काहीतरी ठोस निर्णय हवा आहे. तो ठोस निर्णय घ्या त्यानंतरच या, असे आपण मंत्र्यांना सांगितल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे. यावेळी अण्णा हजारेंनी भाजपसह काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. आपला शब्द न पाळण्यात काँग्रेसने डॉक्टरेट केली आहे तर भाजप यात ग्रॅज्युएट असल्याचेही अण्णा हजारे म्हणाले. या सरकारने गेल्या पाच वर्षांत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही अण्णा हजारेंनी यावेळी केला आहे.

पाच वर्षांपूर्वी लोकपालवर भरभरून बोलणारी मंडळी आता मूग गिळून गप्प आहेत, असे म्हणताना अण्णा हजारेंनी अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या नावांचा उल्लेख केला. लोकपाल आंदोलनामुळेच मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच या सरकारला लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली आहे, असेही अण्णा हजारेंनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar

राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

News Desk

शिवसेना-भाजपची युती तुटणार ?

News Desk