HW News Marathi
राजकारण

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा

मुंबई | निवडणूक आयोगाकडून आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाकडून आज (२० सप्टेंबर) दुपारी २ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोग यावेळी महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंडमध्ये तारखा जाहीर होणार असल्याचे म्हटले जाते. या राज्यात २२ ऑक्टोबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणे गरजेचे आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नुकतेच राज्यातील सर्व प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला होता. त्यामुळे लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना यांच्या युतीच्या जागा वाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप समितीच्या निवडणूक समितीची आज बैठक सुरू आहे. या बैठीत युतीच्या नवीन फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकारे यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशी होती २०१४ची विधानसभा निवडणूक

२०१४ मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होता. गेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सव सांगता १२ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. या कालावधीत सुरक्षेवर मोठ्याप्रमाणात ताण यंत्रणांवर असतो त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर होतील. तर २५ ऑक्टोबर यामुळे दिवाळीच्या आधीचे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याच सांगितल जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीची बैठक

News Desk

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna

जनतेनेच भाजपला रामनाम सत्य केलेय । नवाब मलिक

News Desk