HW News Marathi
राजकारण

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन

मुंबई | नवीदिल्लीतील जंतर मंतर येथे मनुवाद्यांनी आरक्षणाला विरोध करीत संविधान जाळण्याचे निंदनीय कृत्य केले त्या देशद्रोह्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली असून त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले तसेच विविध पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी संविधानाची प्रास्ताविका हाती घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या मुंबादेवी तालुक्याच्या वतीने नागपाडा येथे निदर्शने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे विशाल धिवर , शिरीष चिखलकर यांनी केले तसेच या आंदोलनात रिपाइं चे ज्येष्ठ नेते चंद्रकांत कसबे आणि घनश्याम चिरणकर सहभागी झाले होते. तसेच संविधानविरोधी देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी घाटकोपर पश्चिम पोलीस स्टेशन येथे रिपाइं तालुका अध्यक्ष संदेश मोरे, रिपाइंच्या महिला आघाडी मुंबई प्रदेश प्रमुख संघटक नैनाताई वैराट , शशिकला जाधव , चंद्रकांत निकम आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.याच मागणीसाठी मुलुंड पोलिस ठाण्यावर रिपाइं च्या राष्ट्रीय सचिव शिलाताई गांगुर्डे, राज्य उपाध्यक्ष अनिल गांगुर्डे, तालुका आध्यक्ष योगेश शिलवंत, अजित रणदिवे, अंबर केदारे आदींच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

गोरेगाव मध्ये रमेश पाईकराव, रमेश पाळंदे, उषा रामळू, आदिंच्या नेतृत्वात आंदोलन झाले.दहिसर येथे रिपाइं चे युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड तसेच ताडदेव येथे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सो ना कांबळे आणि सौ शिलाताई गांगुर्डे, अनील गांगुर्डे, जयश्री कांबळे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच टिळकनगर पोलीस ठाणे येथे रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. तसेच बीड मधील वडवणी तालुका अध्यक्ष महादेव उजगरे, उस्मानाबाद मधील भूमी परंडा येथे राज्य सचिव संजयकुमार बनसोडे , तानजी सोनवणे यांच्या नेतृत्वात रिपाइं चे आंदोलन झाले. सोलापूरातील अक्कलकोट येथे रिपब्लकन पक्षाचे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी आंदोलन केले. औरंगाबाद येथेही निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#मीटू मोहिमेला रामदास आठवलेंचा पाठिंबा

swarit

आता नुसते गिरीश महाजनांना बघितले तरी त्यांच्या मनात धाकधूक होते !

News Desk

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा स्थगित, सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य 

News Desk