HW News Marathi
राजकारण

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० यापूर्वीच रद्द करायला हवे होते !

चेन्नई | “काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यास हवे, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. शहांनी आज (११ ऑगस्ट) राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलताना म्हटले की, “काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यास हवे. गृहमंत्री म्हणून माझ्या डोक्यात अनुच्छेद ३७० हटविण्याबद्दल कोणताही गोंधळ नव्हता. मला विश्वास आहे, हे हटविल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी नष्ट होतील, आणि राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करेल असा, विश्वास शहांनी व्यक्त केला होता.

अमित शहा यांनी व्यंकय्या नायडू यांचे आभार मानले आहेत. ‘राज्यसभेत आमचे पूर्ण बहूमत नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की पहिल्यांदा ते राज्यसभेत मांडू त्यानंतर ते लोकसभेत मंजूर करुन घेऊ. त्यावेळी नायडू यांनी राज्यसभेत विधेयक मांडल्यानंतर या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा घसरू दिली नाही. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो’ असे देखील अमित शहा यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानहानी प्रकरण: राहुल गांधी शिक्षेविरोधात सूरत न्यायालयात याचिका दाखल करणार

Aprna

बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ही आपुलकी दिसली नाही

News Desk

महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेची ही घसरण आहे !

News Desk