HW News Marathi
राजकारण

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण उद्या २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, आमदार हुस्नबानो यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी त्यांच्या सोबत असतील.

नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने खासदार अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी खासदार अशोक चव्हाण यांना नाणारला जाण्याची सूचना केली होती. त्यांच्या सुचनेनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारला जाणार आहेत. बुधवारी सकाळी ११.३० वाजता खासदार अशोक चव्हाण कात्रादेवी सागवे तालुका राजापूर येथे स्थानिकांशी संवाद साधणार आहेत व त्यानंतर जाहीर सभेला संबोधीत करणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी सिद्धूंना क्लीन चिट 

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सोमय्यांवर भडकल्या

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…अमरावती मतदारसंघाबाबत

News Desk
मुंबई

प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडवुया – राज्यपाल सी. विद्यासागर राव

News Desk

मुंबई : राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. एक प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाबरोबर सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्नझाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव डी.के.जैन, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, अपर मुख्य सचिव शाम लाल गोयल, प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, आदी मान्यवरउपस्थित होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तानेही राज्यपालांनी यावेळी श्रमिक वर्गाला शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. राज्यपाल पुढे म्हणाले, याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, तसेचसमाजसुधारक, महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारखे इतर थोर नेते यांचे स्मरण करूया, हे आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे संस्थापक आहेत.

 

Related posts

मुंबई आणि इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

Aprna

अश्विनी बिंद्रे प्रकरणात जलद गतीने तपास करण्यात येईल गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

News Desk

अंगणवाडी सेविकांचा मेस्मा काढण्यास सरकारचा पुन्हा नकार ; काय म्हणाले या चर्चेत धनंजय मुंडे

News Desk