HW News Marathi
मुंबई

संगम प्रतिष्ठान करणार गड- किल्ले संवर्धन

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मुंबई महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापन आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने संगम प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने स्वच्छ भारत अभियानात एक पाऊल पुढे टाकले असून,मुंबईतील वरळी चा किल्ला,माहीम किल्ला,बांद्रा फोर्ट,शिवडीचा किल्ला वसायीचा किल्ला असे 5 किल्ले स्वच्छ करण्याचा संकल्प केला असून येथील निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती अभियानही सुरु करण्याचा संकल्प संगम प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

या कामाची सुरुवात १ मे रोजी सायन किल्ल्यावरून करण्यात आली. १ मे ला सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेविका राजश्री शिरवाडकर,भाजपाचे कार्यकर्ते, ए एल एम ,स्थानिक रहिवाशी,वरिष्ठ नागरिकांसह संगम प्रतिष्ठानच्या ३० सदस्यांनी एकत्र येऊन या कील्ल्याची स्वच्छता केली. संगम प्रतिष्ठानच्या सचिव कोमल घाग यांनी येत्या वर्षभरात या किल्ल्याचा जनजागृतीच्या माध्यमातून कायापालट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. संगम प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे मुंबई महानगर पालिकेतून राजस शेळके व तानाजी घाग यांनी कौतुक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वातानुकूलित लोकल पास ३ आणि ६ महिन्यांचा काढता येणार

News Desk

बापमाणूस’च्या सेटवर रंगपंचमी

News Desk

मध्य आणि पश्चिम रेल्वेत एस्क्लेटर घोटाळा

News Desk