HW News Marathi
राजकारण

आधी मला अवघड वाटत होतं मात्र आता यश आपलंच याची खात्री !

पुणे | “मी आठ जिल्ह्यात जाऊन आलो. आधी मला वाटत होतं कि ही निवडणूक अवघड आहे. परंतु, आता यश आपलंच याची खात्री झालीय”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी ट्विट करत हा विश्वास व्यक्त केला आहे.

“सत्ताधारी पक्षांकडे फक्त पैसे आहेत मात्र सांगण्यासारखे काहीच नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना खाजगीत सांगा कि उगाच आता मिळालेले पैसे खर्च करू नका. कारण, परत पैसे मिळतील की नाही माहीत नाही”, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. “पुणे हा देशाला दिशा देणारा मतदारसंघ असल्याने ही निवडणूक नेहमीच”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

News Desk

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

Aprna

महाभारतात इंटरनेट सेवा असल्याचा भाजप मंत्र्याचा दावा

News Desk