HW News Marathi
राजकारण

वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मूत्रसंसर्ग झाला असुन दिल्लीतील ‘एम्स’ने मेडिकल बुलेटीन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त आहेत. ते 2009 सालापासून आजारी असून त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो.

गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपच्या कार्यक्रमात दिसलेले नाहीत. वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर असुन वाजपेयींना सध्या ताप किंवा रक्तदाबाचाही त्रासही नाही. त्यांना उद्या सकाळी डिस्चार्ज दिला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र यावर रुग्णालयाने अधिकृत रीत्या काहीही जाहिर केलेले नाही.

दरम्यान, केंद्रीय मंत्री अरुण जेटली सर्जरीनंतर अजूनही ‘एम्स’मध्येच असुन रुग्णालयात एकच व्हीव्हीआयपी रुम आहे. त्यामुळे त्यामुळे वाजपेयींना क्रिटिकल केअर युनिट म्हणजेच सीसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केल असुन मोदींच्या अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘या’ तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; राजकारणात एकच खळबळ

Aprna

शरद पवारांच्या मते ‘हे’ ३ उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य

News Desk

बिहारच्या छपरा येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन फोडल्याने गोंधळ

News Desk
राजकारण

भाजपाचे सुरेश धस विजयी, धनंजय मुंडेंना धक्का

News Desk

उस्मानाबाद | बहुप्रतिक्षेत असलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहेती. भाजपचे उमेदवार सुरेश धस हे विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. जगदाळेंचा पराभव हा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी जोरदार धक्का मानला जात आहे.

परंतु धस आणि पराभूत उमेदवार जगदाळे यांच्यामध्ये मतांवरुन वाद झाला आहे. त्यामुळे अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या व राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. यात पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related posts

“भूखंड घ्या… कुणी गायरान घ्या…”; सरकारविरोधात ‘मविआ’ची उपहासात्मक दिंडी

Aprna

बिहारच्या छपरा येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन फोडल्याने गोंधळ

News Desk

तुरुंगातून बाहेर आल्यावर राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याचे केले समर्थन

Aprna